ही कथा तिची आहे की माझी? खरंतर दोघींचीही नाही... तिचं आयुष्य अथांग पसरलेलं वाळवंट होतं... सुखाची काही तुरळक मुरुद्याने सोडलीत तर... त्यातली मूठभर वाळू जेमतेम माझ्या वाट्याला आली.मात्र ही वाळू दर वेळी चिमूटभर पुरवून पुरवून मी आजवर वापरते आहे. ती माझी काकू आजी असावी... मधे बरेच चुलत चुलत होते... नेमके किती? मला नीटसे माहीत नाहीत. तिनेही कधीच ते जाणवू दिले नाही."नदीकडची आजी" हे अस्मादिकांनी दिलेलं नामाभिधान... माझ्या सुदैवाने मला भरपूर आज्या होत्या... पणजी आजी,आजी, आईची आई वडिलांची आई, काकू आजी, मावशी आजी...या सगळ्यात मी नुसते "आजी" म्हटलं की ऐकणाऱ्याचा गोंधळ व्हायचा... त्यातल्या त्यात ह्या आजीचे घर नदीच्या बाजूला...खरंतर अगदी काही पैनगंगेच्या किनारी नव्हतं... पण तरीही तिच्या नदी घराजवळ म्हणून ती झाली नदीकडची आजी...मी तिला कधीही शरयू आजी म्हटलं नाही...अगदी काल ती गेल्याचं देखील आईला सांगतांना मी म्हणाले,"आई ... नदीकडची आजी गेली"
एखादी व्यक्ती ह्या विश्वाच्या पसाऱ्यात कुठेतरी असते... ती तिच्या जगात आपण आपल्या जगात व्यस्त असतो... वर्षांच्या आकड्यात आपल्या भेटी झालेल्या नसतात... ही पिढी स्मार्ट फोन वापरणारी नसल्याने digital touch सुद्धा नसतो...तरी ती व्यक्ती आहे ... कुठेतरी आहे हे आपल्याला पुरेसं असतं.एक दिवस ती प्रिय व्यक्ती exit घेते नी आयुष्याच्या तलम पदराचे दोन रेशीम जणू ओढून घ्यावे तसे आतून आपण ओढले जातो.आठवणींचे कोलाज भवताली फेर धरून नाचू लागतात.ओंजळीत उरलेल्या तेव्हढ्या आठवणी आपल्या असतात हक्काच्या स्वतंत्र... तिच्या माझ्या आठवणींचा पेटारा उघडून तर बसलेय बंद करता येणार नाही कधीच माहीत असतांना.
ती मला आठवते तिच मुळी अंगभर सुरकुत्यांची साय लेऊन... विलक्षण खंबीर आणि तेव्हढीच प्रसन्न निर्मळ... आरपार.मी तिला कधीही पराभूत , हरलेलं, वैतागलेलं, संतापलेलं पाहिलंच नाही...तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान शांतता यांचा संगम असणार हास्य कायम असायचं.. हे हास्य जीवनानी तिला सहज दिलं होतं ,असं मुळीच नव्हतं. ही तिची साधना होती, तपश्चर्या होती... आयुष्यभराची.जगण्याच्या अनेक कडव्या परीक्षांतून ती तावूनसुलाखून निघाली होती...मी लहानपणी बरीच रडत राऊ होते .. अनेक लहानमोठ्या गोष्टींत गळे काढायचे..तेव्हा ती कायम सांगायची,"ह्यात तिच्या ! एव्हढंच ना. आपण हसायचं मग कठीण सोप्प होऊन जातं"... तिनेही असंच केलं असावं ... तिच्याकडे गेलं की खरंच सारं सोप्प होऊन जायचं.
माझी शाळा तिच्या घराजवळ होती.. त्यामुळे मधल्या सुट्टीत मी डबा घेऊन तिच्या घरी दाखल व्हायची. मग अर्धा तास तिला वक्ता आणि मला श्रोता मिळायचा... ती मला "फुटाणा" म्हणायची..माझ्या अखंड बडबडीचा तिला कंटाळा येत नसे...तिच्याशी काहीही बोलायला,विचारायला कधी भीती संकोच वाटलंच नाही. फार भोचक आगाऊ प्रश्नांना पाठीत धपाटा मिळत असे... अगदी वर्गात काय झालं पासून कोण काय म्हणाली ?मग मी तिची कशी जिरवली वगैरे सारं तिला सांगायचे.कधी ती मला कविता वाचायला सांगे तर कधी इतिहासातले धडे... त्यातही शिवाजी महाराज किंवा टिळकांचे धडे वाच म्हणायची...तिला मवाळ काही नको असायचे अगदी गांधींचे धडेही. या आमच्या खास हक्काच्या अर्ध्या तासात माझ्यासाठी तिने राखून ठेवलेला काहीतरी खाऊ असायचा... कधी मुरमुऱ्याला तिखट मीठ तर कधी घासभर साबुदाणा खिचडी. माझा अत्यंत प्रिय साखरांबा ...ती फोडींचा साखरंबा झक्कास करायची... अजूनही जिभेवर चव राहिलीये एव्हढा झक्कास...
नदिकडची आजी ... "आजी मटेरियल" अजिबात नव्हती तर मैत्रीण अधिक होती. त्या वेळी हिट असणार आलिशा चिनॉय चं मेड इन इंडिया हे गाणं तिचं आवडतं गाणं होत... तेव्हाही आणि आजही मला गंमत वाटते... हे गाणं तिला आवडायचं?का कोण जाणे?? ☺हे काय आजीजोगं गाणं आहे?? ...इतर आजींसारखं ,"मुलीच्या जातीने असं करू नये" हे घाशीव वाक्य तिने कधीच ऐकवले नाही.तिच्यासाठी हे करावे आणि ते करू नये ह्याचे नियम पक्के होते आणि ते सगळ्यांना सारखे लागू असायचे... त्यात भेदभाव नव्हता. स्वच्छता,नीटनेटकेपणा कमालीचा होता... कधी तिच्या घरात काडी कचरा पाहिला नाही की पसारा पाहिला नाही... सुरेख एका दिशेने सारवलेलं घर अंगण असायचं... झाडांवर विशेष माया होती तिची ... तिच्या अंगणात पपई होती तिची विशेष लाडकी ... पाणी घालतांना हळुवार हात फिरवायची तिच्या बुंध्यावर ... काय गुपित होतं तिलाच ठाऊक... पण भरपूर पपई यायच्या अतिशय गोड चविष्ट.
कधीमधी माझ्यासोबत एक दोन मैत्रिणी सुद्धा डबा खायला मी घेऊन जायची तिच्याकडे... तिने कधी कपाळावर आठ्या पाडल्या नाहीत... जो काही घासभर खाऊ असेल तो तिघींना वाटून दिला जाई..आम्हा सगळ्यांशी तिच्या गप्पा होत असत... माझ्या या मैत्रिणींची जात कधीही तिने विचारली नाही... मी तिची होते मग माझ्या मैत्रिणीही तिच्या झाल्या.संपर्कात येईल त्या प्रत्येक माणसाला जीव लावणं तिला खासच जमायचं.माझ्या आईबाबांवर तिची विलक्षण माया होती म्हणूनचं की काय कणभर अधिकच प्रेम ती माझ्यावर करायची. नाते थेट होते की नव्हते माहीत नाही... मात्र मर्मबंध होते... विश्वास बसणार नाही इतके दाट होते.
एकदा नावडती भाजी मी डब्यात तशीच ठेवली... फेकायला जाणार एव्हढ्यात ती गंभीरपणे म्हणाली,"अन्न फेकतांना आपण कुणाकुणाचा अपमान करतो माहीत आहे... शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा, त्याच्या बैलांचा, आपल्यासाठी ती भाजी आणता यावी म्हणून कष्ट करणाऱ्या वडिलांचा आणि आपले पोट भरावे म्हणून स्वयंपाक करणाऱ्या आईचा..." मी नुसतीच भाजी पटकन खाऊन टाकली...तिचे शब्द मनावर कोरले गेलेत ते कायमचे... तिला अन्न वाया घालवणे, फेकणे माजोरड्या सारखे नासवणे मुळीच आवडत नव्हते,"अन्नाचा माज करायचा नाही" कायम म्हणायची.तिच्या जवळ पांढऱ्या पोलोच्या गोळ्या असतं... बरेचदा त्या मला मिळायच्या.मात्र त्या ती लपवून ठेवायची.. दर वेळी नवीन डब्यात डबा घालून...
देवावर नितांत श्रद्धा होती तिची... ती आठवते ती अखंड देवाचं नाव घेतच.. ती सतत जप करत असायची...त्यात कोणतेही अवडंबर नसायचे..केवळ निखळ नामभक्ती... कण्हेरीच्या फुलांच्या पाकळ्या करून ती देवपूजा करायची... माझ्या अती आगाऊ स्वभावाला साजेसे एकदा तिला विचारलंच,"एव्हढी दारात फुलं आहेत पाकळ्या का ग वाहतेस?" तिला गंमत वाटली हसत हसत म्हणाली, " टोणग्या फुलांनी देव झाकून गेलेले नाही आवडत मला... हात जोडले की दर्शन व्हायला हवे." बालाजी मंदिराच्या मागच्या पायऱ्यावर तिचं घर... आपलं खडतर आयुष्य बालाजीच्या कृपेनेच पार लावल्याचं ती कायम म्हणायची... तिचं आयुष्य कसं होतं हे समजून घ्यायचं तेव्हा माझं वय नव्हतं... पुढे मोठी होतांना हळूहळू कळत गेलं...एखादी कादंबरी व्हावी इतकं सारं तिच्या आयुष्यात होतं... नवरा, तरुण अपत्ये यांची मरणं होती, मुलांची पोटं भरणं रोजचा दिवस ओढणं प्रत्येक दिवस नवा प्रश्न असायचा... मात्र तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता तिने कधीही लोप पाऊ दिली नाही.दुर्दैवाचे दशावतार पाहिले पण ना कधी नशिबाला कोसलं ना कधी विधात्याला...कधीही कुठलीच अपेक्षा तिनं केली नाही ना आजूबाजूच्या माणसांकडून ना नशीबाकडून.
तिच्या पंचाहत्तरीला मी तिच्यावर तोडक्या मोडक्या शब्दात केलेली कविता तिनं पुन्हा पुन्हा आठवण करून देत मागून घेतली...तिनं पुढे बऱ्याच जणांना ती खूप कौतुकानं दाखवली.तिची माझी शेवटची म्हणावी अशी भेट साधारण 3 वर्षांपूर्वीची... तिची पणती पाहण्याच्या निमित्ताने तिलाच भेटायला गेले... खरंतर, तेव्हाच ती फार थकली होती... मी तिला मऊसूत साडी घेऊन गेले... तिला मनापासून आनंद झाला...,"आता मी कधी नेसू ही? किंवा कश्याला मला"असं काहीही कटू ती उच्चारली नाही...मोठ्या प्रेमाने तिनी साडी उकलली.. बराच वेळ शांतपणे ती त्यावर हात फिरवत बसली ... वस्तूमागचं प्रेम माया तिला कायम अधिक कळतं होती. आमच्यातली मधली वर्षे जणू गळून पडली पुन्हा मस्त मोकळ्या गप्पा मारल्या तिनं...माझी लेक पाहून तिला माझं बालपण आठवलं... "अगदी तुझीच कॉपी आहे फुटाणा आहे बोलायला "म्हणत मायेनं कवटाळलं... तेव्हाही गात्र थकलेली असूनही मिश्किलपणा कायम होता... मला म्हणाली,"रोज सकाळी डोळे उघडले की वाटतं अरेच्चा! मी आहे अजून?" वयोमानाने थकलेल्या शरीराला कंटाळली होती ती... त्यात लहानमोठ्या पडझडी... हात मोड पाय मोड सुरूच असायचे... तीच सहन करू जाणे तो त्रास.... कधीकधी मृत्यू अनेक वेदनांचा शेवट असतो... या अर्थी ती ह्या विश्वाच्या जंजाळातून सुटली.ती जिवंतपणीच एव्हढी तृप्त समाधानी होती की नक्कीच मोक्षाची वाट तिला लाभली असणार..
काल नदीकडची आजी गेल्याचं कळलं ...
अन योगायोगानं 90's हिट्स मध्ये नेमकं मेड इन इंडिया गाणं लागलं..... काल पोलोच्या गोळ्याही आणून ठेवल्या ... अजून खाव्या वाटल्याच नाहीत.
माझं बालपण एक केक मानलं तर नदीकडची आजी चेरी ऑन टॉप होती....तिच्या अनंत आठवणींचा पेटारा खुला झालाय... जमेल तसा आवरतेय...
एखादी व्यक्ती ह्या विश्वाच्या पसाऱ्यात कुठेतरी असते... ती तिच्या जगात आपण आपल्या जगात व्यस्त असतो... वर्षांच्या आकड्यात आपल्या भेटी झालेल्या नसतात... ही पिढी स्मार्ट फोन वापरणारी नसल्याने digital touch सुद्धा नसतो...तरी ती व्यक्ती आहे ... कुठेतरी आहे हे आपल्याला पुरेसं असतं.एक दिवस ती प्रिय व्यक्ती exit घेते नी आयुष्याच्या तलम पदराचे दोन रेशीम जणू ओढून घ्यावे तसे आतून आपण ओढले जातो.आठवणींचे कोलाज भवताली फेर धरून नाचू लागतात.ओंजळीत उरलेल्या तेव्हढ्या आठवणी आपल्या असतात हक्काच्या स्वतंत्र... तिच्या माझ्या आठवणींचा पेटारा उघडून तर बसलेय बंद करता येणार नाही कधीच माहीत असतांना.
ती मला आठवते तिच मुळी अंगभर सुरकुत्यांची साय लेऊन... विलक्षण खंबीर आणि तेव्हढीच प्रसन्न निर्मळ... आरपार.मी तिला कधीही पराभूत , हरलेलं, वैतागलेलं, संतापलेलं पाहिलंच नाही...तिच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान शांतता यांचा संगम असणार हास्य कायम असायचं.. हे हास्य जीवनानी तिला सहज दिलं होतं ,असं मुळीच नव्हतं. ही तिची साधना होती, तपश्चर्या होती... आयुष्यभराची.जगण्याच्या अनेक कडव्या परीक्षांतून ती तावूनसुलाखून निघाली होती...मी लहानपणी बरीच रडत राऊ होते .. अनेक लहानमोठ्या गोष्टींत गळे काढायचे..तेव्हा ती कायम सांगायची,"ह्यात तिच्या ! एव्हढंच ना. आपण हसायचं मग कठीण सोप्प होऊन जातं"... तिनेही असंच केलं असावं ... तिच्याकडे गेलं की खरंच सारं सोप्प होऊन जायचं.
माझी शाळा तिच्या घराजवळ होती.. त्यामुळे मधल्या सुट्टीत मी डबा घेऊन तिच्या घरी दाखल व्हायची. मग अर्धा तास तिला वक्ता आणि मला श्रोता मिळायचा... ती मला "फुटाणा" म्हणायची..माझ्या अखंड बडबडीचा तिला कंटाळा येत नसे...तिच्याशी काहीही बोलायला,विचारायला कधी भीती संकोच वाटलंच नाही. फार भोचक आगाऊ प्रश्नांना पाठीत धपाटा मिळत असे... अगदी वर्गात काय झालं पासून कोण काय म्हणाली ?मग मी तिची कशी जिरवली वगैरे सारं तिला सांगायचे.कधी ती मला कविता वाचायला सांगे तर कधी इतिहासातले धडे... त्यातही शिवाजी महाराज किंवा टिळकांचे धडे वाच म्हणायची...तिला मवाळ काही नको असायचे अगदी गांधींचे धडेही. या आमच्या खास हक्काच्या अर्ध्या तासात माझ्यासाठी तिने राखून ठेवलेला काहीतरी खाऊ असायचा... कधी मुरमुऱ्याला तिखट मीठ तर कधी घासभर साबुदाणा खिचडी. माझा अत्यंत प्रिय साखरांबा ...ती फोडींचा साखरंबा झक्कास करायची... अजूनही जिभेवर चव राहिलीये एव्हढा झक्कास...
नदिकडची आजी ... "आजी मटेरियल" अजिबात नव्हती तर मैत्रीण अधिक होती. त्या वेळी हिट असणार आलिशा चिनॉय चं मेड इन इंडिया हे गाणं तिचं आवडतं गाणं होत... तेव्हाही आणि आजही मला गंमत वाटते... हे गाणं तिला आवडायचं?का कोण जाणे?? ☺हे काय आजीजोगं गाणं आहे?? ...इतर आजींसारखं ,"मुलीच्या जातीने असं करू नये" हे घाशीव वाक्य तिने कधीच ऐकवले नाही.तिच्यासाठी हे करावे आणि ते करू नये ह्याचे नियम पक्के होते आणि ते सगळ्यांना सारखे लागू असायचे... त्यात भेदभाव नव्हता. स्वच्छता,नीटनेटकेपणा कमालीचा होता... कधी तिच्या घरात काडी कचरा पाहिला नाही की पसारा पाहिला नाही... सुरेख एका दिशेने सारवलेलं घर अंगण असायचं... झाडांवर विशेष माया होती तिची ... तिच्या अंगणात पपई होती तिची विशेष लाडकी ... पाणी घालतांना हळुवार हात फिरवायची तिच्या बुंध्यावर ... काय गुपित होतं तिलाच ठाऊक... पण भरपूर पपई यायच्या अतिशय गोड चविष्ट.
कधीमधी माझ्यासोबत एक दोन मैत्रिणी सुद्धा डबा खायला मी घेऊन जायची तिच्याकडे... तिने कधी कपाळावर आठ्या पाडल्या नाहीत... जो काही घासभर खाऊ असेल तो तिघींना वाटून दिला जाई..आम्हा सगळ्यांशी तिच्या गप्पा होत असत... माझ्या या मैत्रिणींची जात कधीही तिने विचारली नाही... मी तिची होते मग माझ्या मैत्रिणीही तिच्या झाल्या.संपर्कात येईल त्या प्रत्येक माणसाला जीव लावणं तिला खासच जमायचं.माझ्या आईबाबांवर तिची विलक्षण माया होती म्हणूनचं की काय कणभर अधिकच प्रेम ती माझ्यावर करायची. नाते थेट होते की नव्हते माहीत नाही... मात्र मर्मबंध होते... विश्वास बसणार नाही इतके दाट होते.
एकदा नावडती भाजी मी डब्यात तशीच ठेवली... फेकायला जाणार एव्हढ्यात ती गंभीरपणे म्हणाली,"अन्न फेकतांना आपण कुणाकुणाचा अपमान करतो माहीत आहे... शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांचा, त्याच्या बैलांचा, आपल्यासाठी ती भाजी आणता यावी म्हणून कष्ट करणाऱ्या वडिलांचा आणि आपले पोट भरावे म्हणून स्वयंपाक करणाऱ्या आईचा..." मी नुसतीच भाजी पटकन खाऊन टाकली...तिचे शब्द मनावर कोरले गेलेत ते कायमचे... तिला अन्न वाया घालवणे, फेकणे माजोरड्या सारखे नासवणे मुळीच आवडत नव्हते,"अन्नाचा माज करायचा नाही" कायम म्हणायची.तिच्या जवळ पांढऱ्या पोलोच्या गोळ्या असतं... बरेचदा त्या मला मिळायच्या.मात्र त्या ती लपवून ठेवायची.. दर वेळी नवीन डब्यात डबा घालून...
देवावर नितांत श्रद्धा होती तिची... ती आठवते ती अखंड देवाचं नाव घेतच.. ती सतत जप करत असायची...त्यात कोणतेही अवडंबर नसायचे..केवळ निखळ नामभक्ती... कण्हेरीच्या फुलांच्या पाकळ्या करून ती देवपूजा करायची... माझ्या अती आगाऊ स्वभावाला साजेसे एकदा तिला विचारलंच,"एव्हढी दारात फुलं आहेत पाकळ्या का ग वाहतेस?" तिला गंमत वाटली हसत हसत म्हणाली, " टोणग्या फुलांनी देव झाकून गेलेले नाही आवडत मला... हात जोडले की दर्शन व्हायला हवे." बालाजी मंदिराच्या मागच्या पायऱ्यावर तिचं घर... आपलं खडतर आयुष्य बालाजीच्या कृपेनेच पार लावल्याचं ती कायम म्हणायची... तिचं आयुष्य कसं होतं हे समजून घ्यायचं तेव्हा माझं वय नव्हतं... पुढे मोठी होतांना हळूहळू कळत गेलं...एखादी कादंबरी व्हावी इतकं सारं तिच्या आयुष्यात होतं... नवरा, तरुण अपत्ये यांची मरणं होती, मुलांची पोटं भरणं रोजचा दिवस ओढणं प्रत्येक दिवस नवा प्रश्न असायचा... मात्र तिच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता तिने कधीही लोप पाऊ दिली नाही.दुर्दैवाचे दशावतार पाहिले पण ना कधी नशिबाला कोसलं ना कधी विधात्याला...कधीही कुठलीच अपेक्षा तिनं केली नाही ना आजूबाजूच्या माणसांकडून ना नशीबाकडून.
तिच्या पंचाहत्तरीला मी तिच्यावर तोडक्या मोडक्या शब्दात केलेली कविता तिनं पुन्हा पुन्हा आठवण करून देत मागून घेतली...तिनं पुढे बऱ्याच जणांना ती खूप कौतुकानं दाखवली.तिची माझी शेवटची म्हणावी अशी भेट साधारण 3 वर्षांपूर्वीची... तिची पणती पाहण्याच्या निमित्ताने तिलाच भेटायला गेले... खरंतर, तेव्हाच ती फार थकली होती... मी तिला मऊसूत साडी घेऊन गेले... तिला मनापासून आनंद झाला...,"आता मी कधी नेसू ही? किंवा कश्याला मला"असं काहीही कटू ती उच्चारली नाही...मोठ्या प्रेमाने तिनी साडी उकलली.. बराच वेळ शांतपणे ती त्यावर हात फिरवत बसली ... वस्तूमागचं प्रेम माया तिला कायम अधिक कळतं होती. आमच्यातली मधली वर्षे जणू गळून पडली पुन्हा मस्त मोकळ्या गप्पा मारल्या तिनं...माझी लेक पाहून तिला माझं बालपण आठवलं... "अगदी तुझीच कॉपी आहे फुटाणा आहे बोलायला "म्हणत मायेनं कवटाळलं... तेव्हाही गात्र थकलेली असूनही मिश्किलपणा कायम होता... मला म्हणाली,"रोज सकाळी डोळे उघडले की वाटतं अरेच्चा! मी आहे अजून?" वयोमानाने थकलेल्या शरीराला कंटाळली होती ती... त्यात लहानमोठ्या पडझडी... हात मोड पाय मोड सुरूच असायचे... तीच सहन करू जाणे तो त्रास.... कधीकधी मृत्यू अनेक वेदनांचा शेवट असतो... या अर्थी ती ह्या विश्वाच्या जंजाळातून सुटली.ती जिवंतपणीच एव्हढी तृप्त समाधानी होती की नक्कीच मोक्षाची वाट तिला लाभली असणार..
काल नदीकडची आजी गेल्याचं कळलं ...
अन योगायोगानं 90's हिट्स मध्ये नेमकं मेड इन इंडिया गाणं लागलं..... काल पोलोच्या गोळ्याही आणून ठेवल्या ... अजून खाव्या वाटल्याच नाहीत.
माझं बालपण एक केक मानलं तर नदीकडची आजी चेरी ऑन टॉप होती....तिच्या अनंत आठवणींचा पेटारा खुला झालाय... जमेल तसा आवरतेय...
15/11/2004 रोजी केलेली तिच्यावरची ही कविता
तिलाच स्मरून.......
तिलाच स्मरून.......
प्रिय आजी
तुझ्या अंगणातली पपई
आता पूर्वीसारखी बहरत नाही.
कण्हेरीही आता
पूर्वीसारखी फुलत नाही.
आता पूर्वीसारखी बहरत नाही.
कण्हेरीही आता
पूर्वीसारखी फुलत नाही.
अजूनही दिसतेस तू
पायऱ्यांवर बसलेली...
नेहमीसारखं गोडसं
गालातल्या गालात हसलेली.
पायऱ्यांवर बसलेली...
नेहमीसारखं गोडसं
गालातल्या गालात हसलेली.
तुझ्या प्रत्येक आठवणीबरोबर
आठवतो पाठीत बसणारा
खमंग धपाटा..
अजूनही तोच आहे
तुझा कामाचा सपाटा.
आठवतो पाठीत बसणारा
खमंग धपाटा..
अजूनही तोच आहे
तुझा कामाचा सपाटा.
माझे तुझ्या सहवासातले
जरी आहेत थोडे क्षण
वेळोवेळी जाणवलय मला
तुझं खंबीर मन.
जरी आहेत थोडे क्षण
वेळोवेळी जाणवलय मला
तुझं खंबीर मन.
नदी आटली, गाव सुटलं
तरी तू नदीकडची आजी
आजही धपाटा खायला
आहे मी राजी.
तरी तू नदीकडची आजी
आजही धपाटा खायला
आहे मी राजी.
आज तुझ्या पंचाहत्तरीला
काय देऊ शुभेच्छा
आरोग्य, सुख, शांती लाभो
हीच माझी सदिच्छा!
काय देऊ शुभेच्छा
आरोग्य, सुख, शांती लाभो
हीच माझी सदिच्छा!
तुझं हास्य फुलत राहो
नावाप्रमाणेच खळाळतं
चेहऱ्यावरचं तेज राहो
ताऱ्याप्रमाणे झळाळतं.
नावाप्रमाणेच खळाळतं
चेहऱ्यावरचं तेज राहो
ताऱ्याप्रमाणे झळाळतं.
© यशश्री रहाळकर

Unique नदीकडची आज्जी
उत्तर द्याहटवाछान ग तुझी आजी
उत्तर द्याहटवाखुप छान
उत्तर द्याहटवाVery touching
उत्तर द्याहटवा