फॉलोअर

गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

रस्ता

                     शहरांत माणसांच्या खरंतर दोनच जाती  अस्तित्वात आहेत एक श्रीमंत आणि दुसरी गरीब.... या दोन्ही वर्गांची एकत्र गाठ पडते ती रस्त्यावर. शहरात राहणाऱ्या माणसांचे निम्म्याच्यावर आयुष्य जाते ते ह्याच रस्त्यावर. अजगरासारखे लांबच लांब शहरभर पसरलेले हे रस्ते कित्येकांना स्वप्नांच्या वाटेने घेऊन जातात, कित्येकांना रोजी रोटी साठी मार्ग दाखवतात ....अचानकपणे कधीतरी हे रस्त्यांचे अजगर आपला जबडा उघडतात आणि ह्या अजगरांच्या तोंडात सापडून होत्याचं नव्हतं होतं . हा अजगर मग श्रीमंत-गरीब असा कोणताही भेदभाव न करता माणसं गिळत जातो . बळी रस्ता नव्हे तर अपघात घेतात... आणि अपघात मानवी चुकांमुळे घडतात हे जरी खरे तरी ते घडतात ते ह्या रस्त्यांवर. रस्ता काळ बनत किड्या मुंग्यांसारखे माणसं चिरडत जातो, त्या माणसांना जात नसते, धर्म नसतो... माणूस म्हणावा असंही अस्तित्व उरत नाही मग उरतो तो रक्ता-मांसाचा चिखल....पण फारसा फरक कुणालाच पडत नाही . रस्त्याचा अजगर माणूस गिळून सुस्तावतो .. रस्ता अखंड आपल्याच वेगात सुरू राहतो.
                         काल मध्यरात्रीही अश्याच एका रस्त्याच्या आंधळ्या वळणावरचा अजगर जागा झाला.... एका कोवळ्या पोराचा घास घेऊन त्याची भूक शांत झाली की नाही कोण जाणे?....दुसरा पोर मरणाच्या दारात उभा होता. गज्या बेरड वय 16 वर्षे...जागीच ठार झाला... तर रणजीत मेहता वय 17 वर्षे मृत्यूशी झुंज देत होता.... रणजित वाचायलाच हवा होता . तो मेहता बिल्डरचा एकुलता एक लेक होता... त्यांच्या गडगंज संपत्तीचा एकमेव वारस होता आणि कांतीलाल मेहतांचा जगण्याचा एकमेव आधार होता. पत्नीच्या मृत्यूपश्चात दुसरं हृदय सांभाळावे इतक्या प्रेमानं त्यांनी तो वाढवला होता.... शहरातल्या सगळ्यात महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. फॉरेनच्या निष्णात डॉक्टरांचा ताफाच कांतीलाल मेहतांनी दिमतीला ठेवला होता. रस्त्यावर नेमकं काय झालंय?? ह्याने कांतीलाल मेहतांना अजिबात फरक पडत नव्हता . मागच्याच महिन्यात रणजीतच्या 17 व्या वाढदिवसाला त्यांनी अत्यंत महागडी मर्सिडीज घेतली होती... त्याच कोट्यावधींच्या कारचा या अपघातात चुराडा झाला होता.... रणजीतच्या शरीरात अनेक प्रकारच्या नशेचे ट्रेसेस एकत्रित सापडले होते.. तसा तो बरेचदा हाय प्रोफाइल पार्टीज ना जायचाच... हे सगळं एन्जॉय तो नाही करणार तर कोण करणार?? एक माणूस चिरडून गेला होता त्याच्या गाडीखाली ..मीडियाने मुलाचे वय आणि नशेत गाडी चालवणे सारे उचलून धरले. कांतीलाल मेहतांना ह्या साऱ्यांमुळे काहीही फरक पडला नाही, पडणार नव्हताच. त्यांच्यासाठी रणजीत वाचणे गरजेचे होते, नंतर साऱ्यांची तोंडे कशी बंद करायची हेही त्यांना पुरते माहीत होते. "रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या त्या मेलेल्या मुलाच्या कुटुंबाच्या तोंडावर काही नोटा फेकून मारायला हव्यात", त्यांनी मनाशी ठरवले...पैश्याने सगळे विकत घेता येते... मीडिया, पोलीस, न्याय....फक्त रणजीत वाचायला हवा ....वाचायलाच हवा.
                    गज्या बेरड त्याच्या आईचा आधार होता. पाच वर्षांपूर्वी विषारी दारू पिऊन त्याचा बाप मेला... तेव्हापासून गजाने कुटुंब सावरले.. सांभाळले होते.रस्त्याच्या कडेला उघड्यावर राहणारे हे कुटुंब... गज्याचा आईवर भारी जीव होता.मिळेल ते काम तो करायचा. सिग्नलला थांबलेल्या गाड्या पुसून दे, बूट पॉलिश, गजरे विक,फुलमाळा विक... एक ना अनेक उद्योग करून तो आपले व भावंडांचे पोट भरायचा.त्या रात्री फुलांच्या माळा करत फुटपाथवर बसलेल्या गज्याला एक गाडी त्याच्या दिशेने वेडीवाकडी येतांना दिसली... काही कळायच्या आत तो गाडीखाली चिरडला गेला. गज्याच्या आईने टाहो फोडला... मग पोलिसांचा ससेमिरा पाठी लागला. त्यात न्युज चॅनल वाल्यांनी गज्याच्या आईवरचा अन्याय भडक चित्रित केला. काही सोशल वर्कर्सने गज्याच्या जीवाचे किती पैसे मागायचे हेही सांगितले...मात्र यासाऱ्या साठी तो रणजीत मेहता वाचायलाच हवा होता.... त्याच्यासाठी प्रार्थना करा असेही काही शहाण्यांनी गज्याच्या आईला सुनावले.कुणालाही ह्या तीन दिवसांत गज्याच्या कुटुंबाला पोटाला अन्न द्यावे वाटले नाही.... जगाचा व्यवहार सरत नाही,पोटाची खळगी भरत नाही.. गज्या तर परत येणार नव्हता पण बाकीच्या पोरांना भूक लागली होती.. त्यांना जगवायचे होते.गज्याची आई सारं बाजूला सारून उभी राहिली... चेहऱ्याला रंग फासून... गिऱ्हाईकांची वाट बघत त्याच रस्त्याच्या कडेला उभी राहिली... आज पहिल्यांदा ती पोरांच्या भुकेसाठी देहाचा सौदा करणार होती...देह नश्वर असतो हे तिला ह्याच तर रस्त्याने शिकवले होते.
©🔏 यशश्री                     शहरांत माणसांच्या खरंतर दोनच जाती  अस्तित्वात आहेत एक श्रीमंत आणि दुसरी गरीब.... या दोन्ही वर्गांची एकत्र गाठ पडते ती रस्त्यावर. शहरात राहणाऱ्या माणसांचे निम्म्याच्यावर आयुष्य जाते ते ह्याच रस्त्यावर. अजगरासारखे लांबच लांब शहरभर पसरलेले हे रस्ते कित्येकांना स्वप्नांच्या वाटेने घेऊन जातात, कित्येकांना रोजी रोटी साठी मार्ग दाखवतात ....अचानकपणे कधीतरी हे रस्त्यांचे अजगर आपला जबडा उघडतात आणि ह्या अजगरांच्या तोंडात सापडून होत्याचं नव्हतं होतं . हा अजगर मग श्रीमंत-गरीब असा कोणताही भेदभाव न करता माणसं गिळत जातो . बळी रस्ता नव्हे तर अपघात घेतात... आणि अपघात मानवी चुकांमुळे घडतात हे जरी खरे तरी ते घडतात ते ह्या रस्त्यांवर. रस्ता काळ बनत किड्या मुंग्यांसारखे माणसं चिरडत जातो, त्या माणसांना जात नसते, धर्म नसतो... माणूस म्हणावा असंही अस्तित्व उरत नाही मग उरतो तो रक्ता-मांसाचा चिखल....पण फारसा फरक कुणालाच पडत नाही . रस्त्याचा अजगर माणूस गिळून सुस्तावतो .. रस्ता अखंड आपल्याच वेगात सुरू राहतो.
                         काल मध्यरात्रीही अश्याच एका रस्त्याच्या आंधळ्या वळणावरचा अजगर जागा झाला.... एका कोवळ्या पोराचा घास घेऊन त्याची भूक शांत झाली की नाही कोण जाणे?....दुसरा पोर मरणाच्या दारात उभा होता. गज्या बेरड वय 16 वर्षे...जागीच ठार झाला... तर रणजीत मेहता वय 17 वर्षे मृत्यूशी झुंज देत होता.... रणजित वाचायलाच हवा होता . तो मेहता बिल्डरचा एकुलता एक लेक होता... त्यांच्या गडगंज संपत्तीचा एकमेव वारस होता आणि कांतीलाल मेहतांचा जगण्याचा एकमेव आधार होता. पत्नीच्या मृत्यूपश्चात दुसरं हृदय सांभाळावे इतक्या प्रेमानं त्यांनी तो वाढवला होता.... शहरातल्या सगळ्यात महागड्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. फॉरेनच्या निष्णात डॉक्टरांचा ताफाच कांतीलाल मेहतांनी दिमतीला ठेवला होता. रस्त्यावर नेमकं काय झालंय?? ह्याने कांतीलाल मेहतांना अजिबात फरक पडत नव्हता . मागच्याच महिन्यात रणजीतच्या 17 व्या वाढदिवसाला त्यांनी अत्यंत महागडी मर्सिडीज घेतली होती... त्याच कोट्यावधींच्या कारचा या अपघातात चुराडा झाला होता.... रणजीतच्या शरीरात अनेक प्रकारच्या नशेचे ट्रेसेस एकत्रित सापडले होते.. तसा तो बरेचदा हाय प्रोफाइल पार्टीज ना जायचाच... हे सगळं एन्जॉय तो नाही करणार तर कोण करणार?? एक माणूस चिरडून गेला होता त्याच्या गाडीखाली ..मीडियाने मुलाचे वय आणि नशेत गाडी चालवणे सारे उचलून धरले. कांतीलाल मेहतांना ह्या साऱ्यांमुळे काहीही फरक पडला नाही, पडणार नव्हताच. त्यांच्यासाठी रणजीत वाचणे गरजेचे होते, नंतर साऱ्यांची तोंडे कशी बंद करायची हेही त्यांना पुरते माहीत होते. "रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या त्या मेलेल्या मुलाच्या कुटुंबाच्या तोंडावर काही नोटा फेकून मारायला हव्यात", त्यांनी मनाशी ठरवले...पैश्याने सगळे विकत घेता येते... मीडिया, पोलीस, न्याय....फक्त रणजीत वाचायला हवा ....वाचायलाच हवा.
                    गज्या बेरड त्याच्या आईचा आधार होता. पाच वर्षांपूर्वी विषारी दारू पिऊन त्याचा बाप मेला... तेव्हापासून गजाने कुटुंब सावरले.. सांभाळले होते.रस्त्याच्या कडेला उघड्यावर राहणारे हे कुटुंब... गज्याचा आईवर भारी जीव होता.मिळेल ते काम तो करायचा. सिग्नलला थांबलेल्या गाड्या पुसून दे, बूट पॉलिश, गजरे विक,फुलमाळा विक... एक ना अनेक उद्योग करून तो आपले व भावंडांचे पोट भरायचा.त्या रात्री फुलांच्या माळा करत फुटपाथवर बसलेल्या गज्याला एक गाडी त्याच्या दिशेने वेडीवाकडी येतांना दिसली... काही कळायच्या आत तो गाडीखाली चिरडला गेला. गज्याच्या आईने टाहो फोडला... मग पोलिसांचा ससेमिरा पाठी लागला. त्यात न्युज चॅनल वाल्यांनी गज्याच्या आईवरचा अन्याय भडक चित्रित केला. काही सोशल वर्कर्सने गज्याच्या जीवाचे किती पैसे मागायचे हेही सांगितले...मात्र यासाऱ्या साठी तो रणजीत मेहता वाचायलाच हवा होता.... त्याच्यासाठी प्रार्थना करा असेही काही शहाण्यांनी गज्याच्या आईला सुनावले.कुणालाही ह्या तीन दिवसांत गज्याच्या कुटुंबाला पोटाला अन्न द्यावे वाटले नाही.... जगाचा व्यवहार सरत नाही,पोटाची खळगी भरत नाही.. गज्या तर परत येणार नव्हता पण बाकीच्या पोरांना भूक लागली होती.. त्यांना जगवायचे होते.गज्याची आई सारं बाजूला सारून उभी राहिली... चेहऱ्याला रंग फासून... गिऱ्हाईकांची वाट बघत त्याच रस्त्याच्या कडेला उभी राहिली... आज पहिल्यांदा ती पोरांच्या भुकेसाठी देहाचा सौदा करणार होती...देह नश्वर असतो हे तिला ह्याच तर रस्त्याने शिकवले होते.
©🔏 यशश्री रहाळकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या मौल्यवान प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार ! वाचत रहा छानसे असेच काहीतरी... with kattayashashri तिचं कुंपण तिचं आकाश
धन्यवाद!